ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राजापूरवासीयांचा गुरुवारी रास्ता रोको

राजापूरवासीयांचा गुरुवारी रास्ता रोको

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २३ जानेवारी, २०१३ | बुधवार, जानेवारी २३, २०१३

राजापूर गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी आटल्याने राजापूरवासीयांचा पाणी प्रश्न बिकट बनला असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 24) रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राजापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी येथून जवळच असलेल्या लोहशिंगवे शिवाराजवळ खैराबाई पाझर तलावाच्या खालच्या बाजूस खोदलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीचे पाणी कमी झाले आहे. या विहिरीलगत एका शेतकर्‍याने विनापरवाना खासगी कूपनलिका खोदल्यामुळे विहिरीचे पाणी आटल्याची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख, तसेच ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी वाढावे, यासाठी विहिरीजवळ कूपनलिका खोदण्यासाठी ग्रामपंचायतीने बोअरवेलची गाडी बोलावली असता सदर शेतकर्‍याने हरकत घेऊन ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना खीळ घातली. याबाबत ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत योग्य कार्यवाही होऊन राजापूरकरांचा पाणीप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड, अशोक मुंढे, सखाराम मुंढे, खंडू भोरकडे, अनिल घुगे, राधाकिसन वाघ, भागीनाथ वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity