ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची टंचाईग्रस्त गावांमध्ये जनजागृती

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची टंचाईग्रस्त गावांमध्ये जनजागृती

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३ | मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१३

येवला येथील कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील टंचाईग्रस्त चिंचोडी व अंगणगाव या गावांमध्ये जनजागृती अभियान राबविले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सूचनेनुसार सदर उपक्रम राबविण्यात आला. या गावांमध्ये प्रबोधन फेरी काढण्यात येऊन पथनाट्यांद्वारे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत प्रबोधन केले गेले. चिंचोडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. संगीता पवार होत्या. यावेळी उपसरपंच मच्छिंद्र मढवई, प्राचार्य आर. आर. कदम यांची प्रसंगोचित भाषणे झाली.
अंगणगाव येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी भाऊसाहेब गायकवाड, सुरेश परदेशी, प्राचार्य कदम यांची प्रसंगोचित भाषणे झाली. प्रास्ताविक जी. एस. पठाणे यांनी केले. नियोजन अतुल शिंदे यांनी केले, तर कु. टी.आर. पठाडे, सौ. एस. व्ही. निंबाळकर, एस. एस. धनगे, व्ही. डी. शिखरे, बी. पी. वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity