ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राजापूरचा आठवडे बाजार दुपारनंतरच भरणार

राजापूरचा आठवडे बाजार दुपारनंतरच भरणार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २५ मार्च, २०१३ | सोमवार, मार्च २५, २०१३

येवला तालुक्यातील राजापूर येथे एप्रिल महिन्यापासून रविवारी आठवड्याचा बाजार दुपारी १२ वाजेनंतर भरणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक व सरपंच दत्तू दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. सध्या राजापूरचा बाजार सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भरत असल्याने जवळच असलेल्या गावाच्या लोकांना बजार मिळत नव्हता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून बाजार दुपारनंतर भरवावा, असे सूचित केले होते. त्यावरून ग्रामपंचायतीने २७ मार्च रोजी बाजार जाहीर लिलाव करावयाचे ठरविले आहे. तसा सूचना फलक ग्रामपंचायत कार्यालयापुढे लावण्यात आला आहेत. या लिलावामध्ये घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना भाग घेता येणार नाही. लिलावाचे डिपॉझिट रक्कम ५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावासाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी हजर रहावे,असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity