ताज्या घडामोडी :

.

.
Home » » औरंगाबाद जिल्ह्यातील दोनजण विंचूरजवळ अपघातात जागीच ठार

औरंगाबाद जिल्ह्यातील दोनजण विंचूरजवळ अपघातात जागीच ठार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर ०३, २०१३

येवला - विंचूरनजीक आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र
अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील दोनजण जागीच ठार झाले. नाशिक येथे दशक्रिया
विधीचा कार्यक्रम आटोपून औरंगाबादकडे परतणार्‍या इको स्पोर्ट फोर्ड कार व
ट्रक यांच्यात हा अपघात झाला.
राहुल गणपत वाल्हेकर (३५) औरंगाबाद), सुमनबाई भिकनराव खरे (६५) रा.
भोकनगाव, ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच जण
नाशिक येथील आपल्या नातेवाईकांकडील दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून इको
स्पोर्ट फोर्ड (एमएच २0 सीयू २१) या गाडीने औरंगाबादकडे परतत होते. भरवस
फाट्याकडील लोळगे वस्तीनजीक कारचालकाचा ताबा सुटल्याने फोर्ड गाडी
दुभाजकावरून पलीकडे जाऊन औरंगाबादकडून येणार्‍या मालवाहतूक ट्रकवर (क्र.
डब्लूबी २३ सी ५४६१) आदळल्याने फोर्ड गाडीचा जागीच चक्काचूर होऊन गाडीतील
दोघे जागीच ठार झाले. नागरिकांनी फोर्ड गाडीच्या दरवाजाचे पत्रे तोडून
गाडीमधील लोकांना बाहेर काढले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity