ताज्या घडामोडी :

.

.
Home » » खराब रस्ता दुरुस्त न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

खराब रस्ता दुरुस्त न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १ मार्च, २०१४ | शनिवार, मार्च ०१, २०१४

येवला - (अविनाश पाटील) आगामी तीन महिन्यांत नागडे ते नगरसूल रस्ता
दुरुस्त न झाल्यास नागडे, बल्हेगाव, मातुलठाण (ता. येवला) गावातील
ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे. नागडे ते नगरसूल
या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे चार ते पाच वर्षांपूर्वी
डांबरीकरण झाले होते. सद्यस्थितीत नागडे-बल्हेगावदरम्यान रस्त्यावर खड्डे
पडले आहेत. ग्रामस्थ व शाळकरी मुले या रस्त्याने पायी व बसमधून प्रवास
करतात. नागडे ते नगरसूलमार्गे मातुलठाण हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा,
असेही निवेदनात म्हटले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity