ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कांदा विक्रीसाठी आलेला शेतकरी अपघातात ठार

कांदा विक्रीसाठी आलेला शेतकरी अपघातात ठार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४ | शुक्रवार, ऑगस्ट ०१, २०१४

येवला (प्रतिनिधी) शहरातील नगर -मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातात एक
जण ठार झाला असून १ जखमी झाला आहे. मनमाडकडून कोपरगावकडे जाणाऱ्या आयशर
कंपनीच्या चेसीस वाहनाने कांदा भरलेल्या एपे मिनी ट्रकला ( MH-20
CT-2495) संध्याकाळी ५च्या सुमारास मागून जोरदार धडक दिल्याने एपे मिनी
ट्रक मधील कैलास बाळकृष्ण कदम (३५) रा.बिलवणी ता.वैजापूर हा शेतकरी जागीच
ठार झाला. येवला येथे कांदा विक्रीसाठी कैलास कदम आले होते. कांदा लिलाव
होऊन व्यापाऱ्याच्या खळ्यावर कांदा टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी
उभी असतानाच आयशर चेसीस ने दिलेल्या धडकेत ते ठार झाले. गंभीर जखमी ला
नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवलेले आहे. या बाबत येवला पोलिसामध्ये
अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity