ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला शहराला शुक्रवारपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा

येवला शहराला शुक्रवारपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४ | मंगळवार, ऑगस्ट १२, २०१४

येवला - पालखेड डावा कालव्याला सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लो पाणी
आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारा साठवण तलाव भरला आहे.
त्यामुळे पालिकेने आता 15 ऑगस्टपासून शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा
करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालखेड पाटबंधारे विभागामार्फत सध्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सुरू
आहे. मागील पाणी आवर्तनातून पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 2 चा साठवण तलाव
अधिक क्षमतेने भरण्यात आला नव्हता. पालखेड धरणात पाणीसाठा कमी असल्याने
पाणी आवर्तनातून कमी पाणी देण्यात आल्याने पालिकेने शहराचा पाणीपुरवठा
पाच दिवसांआड केला होता. आता ओव्हरफ्लोचे पाणी मिळाल्याने पालिका तीन
दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity