ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु

अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२ | मंगळवार, ऑगस्ट १६, २०२२

अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु


 येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलाव मध्ये बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  मंगळवारी येवला शेजारी कोपरगाव येथील काही पर्यटक अनकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते.

यात कोपरगाव शहरात राहणारे मिलिंद रवींद्र जाधव (20) आणि रोहित पिंटू राठोड (14) दोघे राहणार धारणगाव रोड कोपरगाव हे पोहण्यासाठी अनकाई किल्ल्यावरील तळ्यात उतरले असता पाण्याचा व तळ्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघा मित्राचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती इतर पर्यटकांनी गावातीलच रमजान सय्यद यांना दिली रमजान सय्यद यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग परदेशी यांना घटनेची माहिती दिली परदेशी यांनी तात्काळ येवला तालुका पोलिसांना माहिती दिली यानंतर गावातील ग्रामरक्षक दलातील पोहणाऱ्या तरुणांच्या साह्याने बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह एक तासाच्या अथक प्रयत्न नंतर तलावातून बाहेर काढण्यात आला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity